गावाचे ग्रामदैवत श्री जोतिर्लिंग आहे. तसेच गावात जोतिर्लिंग, विठ्ठल-रुक्मिणी, महादेव, भावेश्वरी, हनुमान, मरगाबाई तसेच गैबी व गणेश्ा मंदीर आहे. श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिर्लिंगाचे मुख्ादर्शन व कावणे येथील श्री जोतिर्लिंगाचे मुख्ादर्श्ान सारखेच म्हण्ाजे दक्षिण्ाद्वार आहे. या हेमाडपंथी पुरातन मंदीराचा दोन वेळा जिर्णोद्धार झाला आहे. श्री महादेव मंदीर हे पुरातन असून त्याचे बांध्ाकाम हे हेमाडपंथी काळातील आहे. या मंदीराचे वैशिष्ठ्य असे की, जुन्या काळातील लोकांच्या सांगण्यावरुन या मंदिरासमोर नंदीची मुर्ती नाही.
वर्षातुन एक वेळ हरिनाम सप्ताह अख्ांड हरिणाम विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरात साजरा केला जातो. या वेळी गावचे लोक एकत्र येउन हा पारंपारिक उत्सवच मानुन साजरा करतात. श्री जोतिर्लिंगाला दर आमावस्या व पौर्णिमेला महा-मस्तकाभिषेक करुन महाप्रसादही केला जातो. हा उपक्रम खूप पूर्वीपासून अख्ांडपणे सुरु आहे. गावात सार्वजनिक गणेशोत्सव, महाशिवरात्री, हनुमान जयंती, दसरा, दिपावली, गुढीपाडवा हे उत्सव एकत्रपणे साजरे केले जातात.
कावणे हे गाव कृषी प्रधान आहे. दुध्ागंगा नदीच्या कृपा आशिर्वादावर गाव समृध्द झाला आहे. या आर्शिवादावर गावकरी शेतीतून भात, उस, गहू, मका, भाजीपाला यासारखे उत्पादन घेत आहेत. शेती व्यवसायाबरोबर जोड व्यवसाय म्हणून दुग्ध्ा उत्पादन, शेळी, मेंढी पालन, कुक्कुट पालन हा व्यवसाय चालतो. कावणे गाव हे १०० टक्कें हागण्ादारी मुक्त झाले असून सन २००७ व ०८ या निर्मलग्राम पुरस्कार मा. राष्ट्रपती महामहीम श्रीमती प्रतिभा देवीसिंह पाटील यांच्या हस्ते प्राप्त झाला आहे. १०० टक्कें कुटुंबाकडे वैयक्तीक शौचालय आहे.
गावात पारंपारिक उर्जास्त्रोत म्हणुन गोबरगॅसची संख्या २८० इतकी आहे. गावात सोंगी भजन होत असुन धर्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम साजरे केले जातात. गावात नळपाणी पुरवठा केला जातो, त्याची देख्ाभाल ग्रामपंचायत पाहते. गावाला जोडणारा मेनरोड हा चांगल्या प्रतीचा असुन वाडी वसाहतीमुळे अंतर्गत रस्ते व गटर्स करणे गरजेचे आहे. गावामध्ये १ ली ते ७ वी प्राथ्ामिक शाळा असून ८ वी ते १० वी माध्यमिक शाळा आहे.